या कवितेतून सध्य स्थितीवर विडंबन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे,
त्यात कुणाच्याही धार्मिक, राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारे भावना
दुखावण्याचा हेतू नाही.
गोंधळ
------------------------------------------------------------------------
-१-
आज एका कवीचा जन्म माझ्यात झाला,
तुमच्या आमच्या आनंदाचा उपवास सुटला,
चटकन कुणीतरी सांगून गेल, हा कवी नाहीच,
तेव्हा मात्र गर्दीचा भडका उडाला,
अन सरस्वतीच्या मंदिरात राडा झाला,
मग, चित्रगुप्तान मानवाधिकाराचा बडगा उगारला,
अन, देऊळ पुन्हा उभं राहील,
पण देवळात भ्रष्टाचार झाला,
पुजाऱ्यानच चोरीचा घाट घातला,
तेव्हा कळाल कि ते दागिनेच नकली होते,
पुजारी सुटला कारण देवांचा घास देवांच्या ओठी अडला,
इकडे सराफान खोट्या नोटांची तक्रार नोंदवली,
तेव्हा एक चौकशी समिती नेमली गेली,
स्थानिक मोर्चेकऱ्यानचा नेता, चित्रगुप्त, पुजाऱ्याची बायको
अन सराफाचा कारकुन्या सदस्य झाले.
-------------------------------------------------------------------------
-२-
इकडे मात्र गजब चमत्कार झाला,
मूळ विषय केराच्या टोपलीत विसावला,
मला उदयोन्मुख कवीचा पुरस्कार मिळाला,
अन मी माझ्या कवित्वाचा किल्ला सर केला.
-------------------------------------------------------------------------
-३-
त्याचवेळी चौकशी समितीचा अहवाल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी रंगला,
अन इतका सगळा गोंधळ होवून,
अखेरीस नाटकावर पडदा पडला.
-------------------------------------------------------------------------
गोंधळ
------------------------------------------------------------------------
-१-
आज एका कवीचा जन्म माझ्यात झाला,
तुमच्या आमच्या आनंदाचा उपवास सुटला,
चटकन कुणीतरी सांगून गेल, हा कवी नाहीच,
तेव्हा मात्र गर्दीचा भडका उडाला,
अन सरस्वतीच्या मंदिरात राडा झाला,
मग, चित्रगुप्तान मानवाधिकाराचा बडगा उगारला,
अन, देऊळ पुन्हा उभं राहील,
पण देवळात भ्रष्टाचार झाला,
पुजाऱ्यानच चोरीचा घाट घातला,
तेव्हा कळाल कि ते दागिनेच नकली होते,
पुजारी सुटला कारण देवांचा घास देवांच्या ओठी अडला,
इकडे सराफान खोट्या नोटांची तक्रार नोंदवली,
तेव्हा एक चौकशी समिती नेमली गेली,
स्थानिक मोर्चेकऱ्यानचा नेता, चित्रगुप्त, पुजाऱ्याची बायको
अन सराफाचा कारकुन्या सदस्य झाले.
-------------------------------------------------------------------------
-२-
इकडे मात्र गजब चमत्कार झाला,
मूळ विषय केराच्या टोपलीत विसावला,
मला उदयोन्मुख कवीचा पुरस्कार मिळाला,
अन मी माझ्या कवित्वाचा किल्ला सर केला.
-------------------------------------------------------------------------
-३-
त्याचवेळी चौकशी समितीचा अहवाल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी रंगला,
अन इतका सगळा गोंधळ होवून,
अखेरीस नाटकावर पडदा पडला.
-------------------------------------------------------------------------
Kuthun kuthun suchat tula he sarv???
ReplyDelete