बघ,
माझी आठवण येते का?
अन तुझ्या डोळ्यात पाणी दाटत का?
अन,
मग आठवते का?
निळ्याशार समुद्रातील आपली भेट...
बघ जमल तर...
आठवलस ना तर आठवेल तुला,
लाटेकडे पाहून भिजलेल तुझ मन,
मनातील घालमेल अन मग माझी मिठी,
बघ जमल तर...
आठवून बघ तुझ्या डोळ्यातील पाणी,
शहारलेल अंग,कापणारे ओठ,
त्या नजरेने बरच काही सांगून गेलीस,
मग मलाही आठवेल...
माझ्यासाठी आलेल खोट हसू तुझ्या ओठी,
क्षणात लाटांवर स्वर तू,
माझा हात हातात घेउउन बहरणारी तू,
सहज चुंबन घेवून गेलीस,
पहिल्या प्रेमाचा पहिला नजराणा देवून गेलीस,
पुन्हा भेटशील...
तेव्हा दोघही विसरू सगळ जुन,
नात्याची वीण घट्ट विणू,
मग परत बाय म्हणताना,
माझ्याही डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दाटेल.
---- शिवरंजन कोळवणकर
tuzi kavita fakt kavita ahe ki ekhadya divasacha varnan...?????
ReplyDeleteprem karan kadhi mala jamlach nahi .. aani jichyavar mi manapasun prem kel ti....
ReplyDelete@ vaishali : tu , me ani ti apan tighe bhatyachya pulavar gelo hoto na tyach varnan , athaval ka.
ReplyDelete@gurudada : dada are ya athvani asha astat na ki ya athvani ayushyabhar jagnyach bal detat.